आमच्याबद्दल

राष्ट्रीय अनुवाद अभियान ही भारत सरकारची अशी योजना आहे की जिचा सर्वसामान्यपणे उद्देश हा भाषांतराचा उद्योग स्थापन करणे तर मुख्य उद्देश हा भारतीय भाषांमध्ये साहित्येतर ग्रंथांची पोच विद्यार्थी व अकादमी पर्यत करून उच्च शिक्षणाला चालना देणे हा होय. NTM चा हेतू संविधानाच्या ८ व्या परिशिष्ठात नोंदवलेल्या सर्व भारतीय भाषेत ज्ञानाचा प्रसार भाषांतराच्या माध्यमातून करणे हा होय.

भाषांतरकारांना दिशा देण्यासाठी, प्रकाशकांना प्रोत्साहित करण्यासाठी, प्रकाशित भाषांतराचा डाटाबेस भारतीय भाषांतून, भारतीय भाषांमधे बाळगल्या/ जतन केल्या जातो. तसेच भाषांतराचा माहितीगार/साठा निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केल्या जातात. ह्या प्रयत्नाद्वारे NTM भाषांतराचा उद्योग स्थापू इच्छिते. अशी आशा केल्या जाते की भाषांतराच्या माध्यमातून नवनवीन संज्ञांचा तसेच डिसकोर्स स्टाईलचा विकास करून भाषेच्या आधुनिकीकरणास चालना दिल्या जाईल. ह्या कामात भाषांतरकार एक महत्त्वाची भूमिका बजावतील खास करून भारतीय भाषेतील अकादमीक डिसकोर्ससाठी.

भाषांतराचा उद्योग बनवण्याचा हेतू साध्य करण्यासाठी साहित्येतर ग्रंथाचे भाषांतर ही पहिली पायरी होय. ज्ञान प्रसारा अंतर्भूत सर्व पाठ्यपुस्तकीय साहित्य साहित्येतर ग्रंथांचा कॉर्पस होय. सध्या NTM, उच्च शिक्षणासंदर्भातील सर्व शैक्षणिक साहित्याचे भाषांतर २२ भारतीय भाषांमध्ये करण्यात गुंतलेले आहे. NTM चा उद्देश हा मोठ्या प्रमाणावर ज्ञानाचे दालन उघडे करणे हा होय त्यासाठी मुख्यत; इंग्रजीत उपलब्ध असलेल्या उच्च शैक्षणिक ग्रंथांचे भारतीय भाषांत भाषांतर करणे जे की काळाच्या ओघात सर्वसमावेशक ज्ञान समाज